Sunday, August 5, 2007

कांही चारोळ्या........

एकदा मला ना

तू माझी वाट पहाताना पहायचंय

तेवढ्यासाठी आडोशाला

हळूच लपून रहायचंय

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं

तुला शंभर वर्षे आयुष्य आहे.

मरण ही चाट पडलं म्हणालं

काय हा मनुष्य आहे ?

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इथे प्रत्येकजण आपआपल्या घरात,

अन प्रत्येकाचं दार बंद आहे

तरी एकोप्यावर बोलणं हा

प्रत्येकाचा छंद आहे

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
घराभोवती कुंपण हवं

म्हणजे आपलं जग ठरवता येतं

बाहेर बरबटलेलं असलं तरी

आपल्यापूरतं सावरता येतं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तू बुडताना मी

तुझ्याकडे धावलो ते

मदतीला नव्हे सोबतीला,

नाहीतर... मला तरी कूठे येतय पोहायला
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आठवतय तुला आपलं

एका छत्रीतून जाणं

ओंघळणारे थेंब आपण

निथळताना पहाणं
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझ्या प्रत्येक क्षणात

तुझा वाटा अर्धा आहे

भूतकाळ आठवायचा तर

तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आठवणींच्या देशात

मी मनाला कधी पाठवत नाही

जाताना ते खुष असतं

पण येताना त्याला येववत नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
- चंद्रशेखर गोखले यांच्या "मी माझा"

1 comment:

Unknown said...

wah nitin saheb....simply
la...ja...waa...aaab.
sorry marathit na lihilya baddal.
kharach khup avadlya charolya...